breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#waragainstcorona : 36 दिवस अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थ्यांना घरी जाण्याची मुभा; केंद्राचा मोठा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/2-27.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.