Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

रशियासाठी भारताचं स्थान काय, यावर पुतिन यांचं उत्तर म्हणजे अमेरिका, चीन, पाकिस्तानला सूचक इशारा

Vladimir Putin : भारत आणि रशियाचे जुने मैत्री संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत अडचणीत असताना नेहमीच रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन जवळचे, हक्काचे मित्र आहेत. एक रशिया आणि दुसरा इस्रायल. रशियासोबत आपले सर्वात जास्त संबंध संरक्षण क्षेत्रात आहेत. अलीकडच्या काळात आपण त्यांच्याकडून तेल खरेदी सुरु केली. आंतरराष्ट्रीय मंचावर भारत आणि रशियाने नेहमीच परस्परांना साथ दिली आहे, सहकार्य केलं आहे. भारत-रशियाची ही मैत्री अमेरिकेच्या डोळ्याना खुपते. त्यांच्या निर्णयांमधून हे अनेकदा दिसून आलं आहे. पण भारताचं धोरण तटस्थतेचं आहे. भारत सर्वांसोबत मैत्री करताना समानता ठेवतो. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला Su-57 देण्याची ऑफर दिली आहे.

हे रशियाचं सध्याचं सर्वात अत्याधुनिक, घातक फायटर जेट आहे. पुतिन यांनी भारतासोबत मिळून स्टेल्थ फायटर जेट संयुक्तरित्या विकसित करण्याचा आणि उत्पादनाचा प्रस्ताव दिला आहे. इंडियन एअर फोर्सची स्क्वाड्रन संख्या घटली आहे. भारताला पाचव्या पिढीच्या फायटर विमानांची गरज आहे. स्वदेशी AMCA प्रोजेक्टला विलंब होत आहे. अशावेळी भारताकडे रशियाची ऑफर आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय मीडियाशी बोलताना पुतिन यांनी रशिया भारताला Su-57 चा पुरवठा करण्यास, पुढे त्यांचा विकास करण्यासाठी आणि महत्वाची टेक्नोलॉजी देण्यासाठी तयार आहे असं म्हटलं. भारतासोबत संरक्षण क्षेत्र सहकार्यामध्ये कुठलीही मर्यादा नाही हे पुतिन यांनी स्पष्ट केलं. पुतिन यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. यात एक संदेश आहे.

हेही वाचा –  पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी

‘संरक्षण क्षेत्र सहकार्यामध्ये कुठलीही मर्यादा नाही’ याचा अर्थ रशिया त्यांच्याकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्र भारताला उपलब्ध करुन देईल. चीन, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यासाठी एकप्रकारे हा स्पष्ट संदेश आहे. रशियाकडून कुठल्या देशाने S-400 एअर डिफेन्स प्रणाली विकत घेऊ नये, म्हणून अमेरिकेने खास कायदा बनवला आहे. पण या कायद्यातून भारताला सूट आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सर्वांनीच पाहिलं S-400 सिस्टिमने पाकिस्तानची कशी वाट लावली होती. त्यामुळे पुतिन यांचे हे शब्द खूप महत्वाचे आहेत.

भारत स्वत: AMCA प्रोजेक्ट अंतर्गत पाचव्या पिढीचं विमान विकसित करत आहे. 15000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. पण हे विमान 2030 नंतरच मिळू शकतं. मधल्या काळात भारताकडे कुठलही पाचव्या पिढीचं फायटर जेट नसेल. त्यात चीनने पाकिस्तानला J-35 A फायटर विमान दिलं, तर त्याचा मुकाबला करण्यासाठी भारताकडे स्वत: पाचव्या पिढीचं विमान नसेल. स्वत: पाचव्या पिढीचं विमान विकसित करेपर्यंत आपल्याकडे रशियाच्या SU-57 चा पर्याय आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button