breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#Lockdown: लॉकडाउनमधून हळूहळू बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणं आवश्यक: फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/4-5.jpg)
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ४ मे पासून दोन आठवड्यांसाठी पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प झालं आहे. दरम्यान, राज्यालाही लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.”हळूहळू आपल्याला लॉकडाउनमधून बाहेर पडून अर्थव्यवस्था सुरू करणं आवश्यक आहे,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.