breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | मागील २४ तासात ४६५ मृत्यू तर १५ हजार नवे रुग्ण

मुंबई | देशात मागील २४ तासात आतापर्यंतचा सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एका दिवसात तब्बल ४६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात २४ तासात तब्बल १५९६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा वाढतच चालला आहे. त्यामुळे आता सरकारची चिंता वाढली आहे.

भारतात आतापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ४ लाख ५६ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ४,५६,१८३ रुग्ण समोर आले आहेत.  त्यापैकी १४४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या रुग्णांचा आकडा हा वाढतानाच दिसतो आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत २,५८,६८५ जण बरेही झाले आहेत. सध्या १,८३,०२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button