breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य – केंद्र सरकार
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
देशातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्यानंतर 7 दिवसांसाठी होम क्वारंटाईन अनिवार्य करण्याचा आदेश दिले आहेत. सात दिवसांनंतर आठव्या दिवशी RTPCR चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, हे आदेश 11 जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.