15 जुलैपर्यंत आंतररराष्ट्रीय उड्डाणे रद्द…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/indians-coming-back-india-from-italy-due-to-corona-1.jpg)
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आगामी १५ जुलैपर्यंत आंतररराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. देशासह जगातही कोरोनाबाधितांचा रोज नवा आकडा समोर येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय १२ ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवासही करता येणार नसल्याचं, असे रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे .
लॉकडाऊन सुरु केल्यापासून साधारणत: अडीच महिन्यांच्या काळानंतर २५ मे रोजी काही अटींसह देशांतर्गत ठराविक मार्गांवरच विमान वाहतूक सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही सुरू होण्याची अपेक्षा असतानाच कोरोनाचे संकट दिवसांगणिक वाढत असल्याने १५ जुलैपर्यंत विमान वाहतूक सुरळीत होणार नाही. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानुसार, पुढील काळात ठराविक मार्गावरीलच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाईल. तसेच, त्या-त्या वेळच्या गरजेनुसार निर्णय घेतला जाईल.
याशिवाय रेल्वे मंत्रालयानेही लॉकडाऊन वाढवला असून, १२ ऑगस्ट २०२० पर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही. पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस, उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून रेल्वेची प्रवासी सामान्य सेवा बंद राहणार आहेत. रेल्वे विभागाने १४ एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व नियमित वेळापत्रकानुसार धावणार्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. त्याची पूर्ण रक्कम प्रवाशांना देण्यात येणार आहे.