‘..तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल’; कंगना रानौतचं विधान चर्चेत
मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रानौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने राजकारणात येण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. देशाला माझी गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.
कंगना रणौत म्हणाली की, मला सुरूवातीपासूनच समाज कार्य करायला आवडते. तसाच मला राजकारणाची देखील आवडत आहे. यामुळे जर मला राजकीय कोणत्याही पक्षाने संधी दिली तर मी राजकारणात प्रवेश करेल. याचप्रमाणे देशाचा विचार करून देशाला गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल. तसंच मी राजकारणात काम करण्यासाठी पात्र आहे की नाही हे जनता ठरवेल. पण मी अभिनय आणि राजकीय क्षेत्रात झोकून काम करेल.
मला अनेक लोक चुकीच समजतात. काहीह बोलते म्हणतात. परंतु मी कोणत्याही व्यक्तीची बाजू घेत नाही. माझं नुकसान होत असेल तरी देशाचा विचार करून एखाद्या गोष्टीवर मी व्यक्त होत असते. माझं मत अनेकांना खटकतं. माझी लढाई एखाद्या व्यक्तीसोबत नसून त्या व्यक्तीच्या विचारांसोबत आहे. ज्यावेळी माझं मुंबईमधील घर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडलं तेव्हा मात्र त्यांनी हातातल्या सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत माझं घर पाडलं. असा प्रकारे माझं घर पडलं जाईल याचा विचार देखील मी केला नव्हता, असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.