breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

कालीचरण महाराजांचं महात्मा गांधी यांच्याबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले,..

नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केले ते योग्य केलं, असं कालीचरण महाराज म्हणाले.

नथुराम गोडसे यांनी जे केलं ते योग्यच केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे वाचाल तर त्यांचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधी यांचे विरोधक बनाल, असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलं आहे.

राहुल गांधी हिंदूवाद्यांची निंदा करतात मात्र हिंदू आता शेळपट राहिला नाही. जे हिंदू हिताची गोष्ट करतात ते यांच्यासाठी शत्रू आहेत. समाजात होणाऱ्या दंगली या एका विषिष्ट समाजाकडून घडवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप कालीचरण महाराज यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button