संभाजी भिडेंबाबत सरकार आणखी किती खोटं बोलणार? जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. यानंतर त्यांनी महात्मा फुले आणि साईबाबा यांच्या विषयीही वादग्रस्त विधान केलं आहे. भिडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गदारोळ पाहायला मिळाला. राज्य सरकारने संभाजी भिडेंची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. संभाजी भिडे यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवलीच नाही, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट पुरावाच सादर केला. त्यांनी संभाजी भिडे यांच्या सुरक्षेच्या व्हिडीओचा ट्वीटरवर शेअर केला आहे.
हेही वाचा – देशातील ‘ही’ आहेत टॉप-५ मॅनेजमेंट कॉलेज, प्लेसमेंटमध्ये मिळते करोडोंचे पॅकेज
सरकार म्हणतं,मनोहर भिडेला सुरक्षा नाही.
खालील व्हिडिओ बघा.ते पुरावे आहेत…गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये मनोहर भिडे अकोला आणि अमरावती येथे फिरत होते त्याचे.सरकार किती खोटं बोलणार…? pic.twitter.com/Sp7aqtY2SW
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 2, 2023
सरकार म्हणतं,मनोहर भिडेला सुरक्षा नाही. खालील व्हिडिओ बघा.ते पुरावे आहेत…गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये मनोहर भिडे अकोला आणि अमरावती येथे फिरत होते त्याचे. सरकार किती खोटं बोलणार…? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.