विदर्भाच्या चळवळीला बळ देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे त्यासाठी खास स्ट्रॅटेजी?
![Is election strategist Prashant Kishor a special strategy to strengthen the Vidarbha movement?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Is-election-strategist-Prashant-Kishor-a-special-strategy-to-strengthen-the-Vidarbha-movement.jpg)
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला बळ देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे त्यासाठी खास स्ट्रॅटेजी तयार करीत असल्याची माहिती आहे. देशाच्या राजकारणात दशकभरापूर्वी ‘चाणक्य’ म्हणून प्रकाशझोतात आलेल्या प्रशांत किशोर यांच्या टीमचे एकूण २० सदस्य सद्यस्थितीत विदर्भात आहेत. ८ सदस्य ३ दिवसांपूर्वी, तर १२ सदस्य दोन दिवसांपूर्वी दाखल झाले. विदर्भाच्या चळवळीची रणनीती तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मत जाणून घेण्यात येत आहे. राजकीय, सामाजिक, औद्योगिक संघटनांसह विदर्भवाद्यांशीही त्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते.
भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आखलेल्या व्यूहरचनेनंतर प्रशांत किशोर हे प्रकाश झोतात आले. यानंतर काँग्रेस, टीएमसी तसेच, विविध पक्षांसाठी त्यांनी काम केले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मातोश्री भेट बरीच चर्चेत होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही ते वर्षभरापूर्वी भेटले.
विदर्भाची चळवळ अनेक दशकांपासून सुरू आहे. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या काळात चळवळ टिपेला होती. परंतु, यश आले नाही. विविध पक्ष व संघटना वेळोवेळी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतात. विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाचे सातत्य दशकाभरापासून कायम राखले आहे. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मध्यंतरी बेमुदत उपोषण केले होते. अलीकडेच त्यांनी विदर्भ यात्रा जाहीर केली; पण, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे त्यांनी यात्रा रद्द केली.