Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

चिंताजनक! करोनाचे नवे रुग्ण ५०० च्या वर

मुंबई : राज्यात रविवारीही नव्या करोनारुग्णांची संख्या ५००च्या वर गेली. गेल्या २४ तासांत ५५० बाधितांची नोंद झाली, तर ३२४ रुग्ण बरे होऊन घरे परतले. तसेच राज्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०९ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.८७ टक्के आहे. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रात रविवारी ३७५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्य सरकार करोनारुग्णांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवून आहे. अद्याप रुग्णसंख्येत काळजी करण्यासारखी वाढ होत नसली तरी ही वाढ अशीच सुरू राहिली तर पुन्हा मास्कची सक्ती करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने ‘मटा’ला सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात ठाणे शहरात २७, कल्याण-डोंबिवली २, नवी मुंबई २३, भिवंडी १, मिरा-भाईंदर ८, ठाणे ग्रामीणमध्ये ३ असे एकूण ६४ नवे रुग्ण आढळले. परंतु, शनिवारच्या तुलनेत रविवारी करोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button