मधुमेह व्यक्तींनी उन्हाळयात सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं
उन्हाळयाचे दिवस म्हंटलं की उकाडा

मुंबई : उन्हाळयाचे दिवस म्हंटलं की उकाडा या दिवसात थोडं थंड आणि टेस्टी पदार्थ खायला सर्वांचं आवडते. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या दिवसांमध्ये सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काही विशिष्ट उन्हाळी पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि आरोग्यावर याचा परिणाम करू शकतात. चला तर पाहूया, ‘हे’ ५ उन्हाळी पदार्थ जे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शक्यतो टाळले पाहिजेत
साखर घालून केलेले सरबतं आणि सॉफ्ट ड्रिंक्स
उन्हाळ्याच्या उकाड्यात थंड सरबत प्यायला कोण नाही म्हणेल? पण लिंबूपाणी, आमपणा, कोल्ड्रिंक्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर असते. ही साखर रक्तातील ग्लुकोज पातळी झपाट्याने वाढवते, जे मधुमेहासाठी अत्यंत घातक आहे. या व्यतिरिक्त तुम्ही साखर न घालता ताक, नारळपाणी, किंवा ताजं लिंबूपाणी पियू शकता.
आईसक्रीम, कुल्फी व फ्रोजन डेझर्ट्स
आईसक्रीम, कुल्फी खायला कितीही आवडली, तरी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी थोडा विचार करायलाच हवा. या पदार्थांमध्ये साखर, कृत्रिम चव आणि फॅट्स इतक्या प्रमाणात असतात की ते साखर नियंत्रणासाठी धोकादायक ठरतात.
हेही वाचा – खरी बाकरवडी कुणाची? पुण्यात चितळेंच्या नावाने दोन बाकरवडींची विक्री, गुन्हा दाखल
फास्ट फूड व तळलेले पदार्थ
समोसा, बटाटेवडा, चिवडा यांसारखे स्नॅक्स तळलेले असल्यामुळे त्यात ट्रान्स फॅट्स आणि कॅलरी जास्त असतात. हे पदार्थ मधुमेहासाठी नुकसानकारक असतात. या व्यतिरिक्त बेक केलेले स्नॅक्स, भिजवलेले मूग/चणे, थोडेसे सुकामेवा या पदार्थाचे सेवन करू शकता.
अति गोड फळं आंबा, चिक्कू, केळी
या फळांमध्ये नैसर्गिक साखर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हे फळ मर्यादित प्रमाणातच खावं. याला पर्याय जामून, पपई, सफरचंद, स्ट्रॉबेरी ही फळं कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली आहेत हे खाऊ शकता
पॅकबंद फळांचे रस (फ्रूट ज्यूस)
बाजारात मिळणारे डबाबंद ज्यूस ‘हेल्दी’ वाटत असले, तरी त्यात लपलेली साखर आणि कृत्रिम रसायनं असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.याला पर्याय साखर न घालता बनवलेला घरगुती फळांचा रस किंवा थेट फळंच खाऊ शकता.