Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#CoronaVirus: विदेशातून आल्यावर विलगीकरण स्वखर्चानेच!
देशांतर्गत लोकांच्या प्रवासाची सोय केल्यानंतर आता केंद्र सरकार विदेशात अडकलेल्या नागरिकांनाही टप्प्याटप्प्याने भारतात आणणार आहे. बिगर व्यावसायिक विमानसेवा तसेच नौदलाच्या जहाजांच्या मदतीने या नागरिकांना परत आणले जात आहे. विदेशात अडकलेल्या नागरिकांनी भारतीय दूतावास व उच्चायुक्त कार्यालयात नोंदणी करावी. करोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाच विमान प्रवासाची अनुमती देण्यात येणार आहे. देशात परत आल्यानंतर प्रत्येक नागरिकाने स्वखर्चाने १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करणे सक्तीचे करण्यात आले असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.