राज्यात उद्या मुसळधार पाऊस; ४ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील ४ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे.
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. आज विदर्भातील ४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबई, पुणे, ठाण्यासह २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ कृतीवर सामनातून हल्लाबोल!
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपुर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.