breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“..तर जितेंद्र जितुद्दीन, अजित अजदुद्दीन तर शरद पवार हे शमशुद्दीन असते”; भाजप नेत्याची घणाघाती टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा इतिहास लिहिला गेला नसता, असं वक्तव्य केलं. आव्हाडांच्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र हा जितुद्दीन असता, अजित हे अजदुद्दीन तर शरद पवार हे शमशुद्दीन असते, अशी घणाघाती टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. पण आव्हाड यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र हा जितुद्दीन, अजित हे अजदुद्दीन तर शरद पवार हे शमशुद्दीन झाले असते. त्याला सांगायला नव्या कुणाची गरज नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button