मनसे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट, चर्चांना उधाण
पुणे | पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. वसंत मोरेंनी रात्री १२ वाजता एक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची आता जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर वसंत मोरे पक्षाला रामराम करणार का? याच्याही चर्चा रंगल्या आहेत.
वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो.” ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात वसंत मोरे यांनी लिहिलेली भावनिक पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.
हेही वाचा – ‘मोदी आणि माझे चांगले संबंध पण..’; शरद पवारांचं विधान चर्चेत
काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. नाशिकच्या मेळाव्यात त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. या सगळ्या घडामोडी आधी घडलेल्या असतानाच त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.