आषाढी पालखी सोहळा आला तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच..!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-19-1-780x470.jpg)
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचा पायी पालखी सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. त्याकडे पीएमआरडीए आणि चाकण एमआयडीसी, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदी, देहू, तुळापूर अशी प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. तेथे लाखो वारकरी येत असतात. इंद्रायणीस्नान, नगरप्रदक्षिणा, माउलींचे दर्शन असा वारकऱ्यांचा अलिखित नियम आहे. गेल्या वर्षभरात इंद्रायणी नदी अनेकदा फेसाळली आहे. शनिवारी सकाळी पुन्हा फेस आला.
हेही वाचा – ऑलिम्पिक दिनानिमित्त बाणेरमध्ये खेळाडूंसाठी परिसंवाद
आषाढी वारीचा सोहळा आठ – दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी राज्यभरातून देहू आणि आळंदीमध्ये लोखो वारकरी येणार आहेत. वारकरी हे इंद्रायणी नदीमध्येच स्नान करतात. या फेसाळलेल्या पाण्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.