breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जालन्यात आज ओबीसींचा एल्गार; सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकाच मंचावर

पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आज जालन्यात ओबीसींचा मेळावा होत आहे. या सभेला राज्यातील महत्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांच्या नेतृत्वात होणार एल्गार सभा होणार आहेत. तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यादेखील या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

जालन्यातील आजच्या सभेला पाच लाख ओबीसी बांधव येतील असा अंदाज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला आहे. सध्याचा परिस्थिती समाजामध्ये सध्या संविधानिक अधिकारावर गदा येईल का? अशी भीती आहे. हीच भीती दूर करण्यासाठी तसेच जरांगे पाटलांनी ज्या जिल्ह्यातून मराठा आरक्षणाचासाठी रान पेटवलं आहे. त्याच जालन्यातील अंबडमध्ये जाहीर सभेतून ओबीसी समाजाला एकत्रित करण्याचं काम आम्ही करतो आहोत, असं बबनराव तायवडे म्हणाले.

हेही वाचा – ‘मराठ्यांचा ७० वर्षे घात झाला..’; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप 

‘या’ आहेत प्रमुख मागण्या..

  • ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये
  • बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी
  • मराठा समाजाला दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी
  • खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • ७ सप्टेंबर २०२३ रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा
  • बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचं वाटप करावं
  • धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button