थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड विधेयक विधानसभेत मंजूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली.
दरम्यान, मी कधी काम सांगितले आणि ते काम एकनाथ शिंदे यांनी कधी नाकारलं आहे असं झालं नाही त्यामुळे ‘थेट नगराध्यक्ष’ निवडीच्या या विधेयकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेरविचार करतील असा विश्वास व्यक्त करतानाच या विधेयकाला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोध केला.
या विधेयकामुळे नगरपालिकेच्या कामकाजात मोठा गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच नगरपालिका अशा आहेत ज्या ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचे आणि सदस्यांची बहुसंख्या विरोधी पक्षाची. यामुळे अनेक निर्णय होत नाही, प्रयत्न करून घेतला तरी त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही आणि नगरपालिकेचे कामकाज ठप्प होते त्यामुळे अपप्रवृत्ती वाढीस लागेल असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.