breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जलआक्रोश मोर्चात वरुणराजाची हजेरी, देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘मुख्यमंत्र्यांनी नाही पण देवाने पाणी दिलं’

जालना : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर ठाकरे सरकार गंभीर नाही. मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला, पहिल्यांदा सांगितलं की ही योजना रद्द केली नाही, नंतर एकही रुपयाचा निधी दिला नाही. पण मी आज या मोर्चाचा निमित्ताने सांगू इच्छितो, जोपर्यंत सरकार जनतेला पाणी देत नाही, तोपर्यंत यांना आम्ही झोपू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

जालन्यात आज भाजपने ‘जलआक्रोश मोर्चा’चं आयोजन केलं होतं. जालन्याचे हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, संतोष पाटील दानवे यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला. मराठवाडा पाणी प्रश्नावरून भाजप चांगलंच आक्रमक झालं आहे. औरंगाबादनंतर आज जालन्यात भाजपने जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं.

‘मुख्यमंत्र्यांनी नाही पण देवाने पाणी दिलं’

जलआक्रोशात मोर्चावेळी वरुणराजाने हजेरी लावली. यावरुन फडणवीसांनी शाब्दिक कोटी केली. “सरकार कुठे चाललंय?, मुख्यमंत्री कार चालवतात, अन् सरकार भगवान चालवतं. ईश्वर भरोसे चाललंय सगळं. आम्ही पाणी मागायला आलो. मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही. पण ईश्वराने पाणी दिलं”, असं फडणवीस म्हणाले.

मविआ सरकारमुळे पाण्याच्या योजना रखडल्या

“पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाही. मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या. या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला. पहिल्यांदा सांगितलं की ही योजना रद्द केली नाही. नंतर एकही रुपयाचा निधी दिला नाही. ठाकरे सरकार टक्केवारी वसुलीत खूश आहे. पण पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांना झोपू देणार नाही”, असा इशारा फडणवीसांनी दिला.

…तर मराठवाड्यात कधीही पाणी टंचाई निर्माण झाली नसती!’

“जर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना झाली असती तर मराठवाड्यात कधीही पाणी टंचाई निर्माण झाली नसती. हे सरकार पाण्याचा शत्रू आहे. सगळ्या पाण्याच्या योजनांची ठाकरे सरकारने हत्या केलीय. मविआ सरकारने वैधानिक विकास महामंडळाची हत्या केली. सरकारमध्ये अनेक मराठवाड्याचे मंत्री आहे. पण एकाही मंत्र्यांने तोंड उघडलं नाही. कारण हे सरकार टक्केवारी वसूलीत खूश आहेत. यांचे खिसे भरायचे चालले आहेत. यांना जनतेचं काही देणंघेणं नाहीये. चालू कामं बंद करण्याचं एवढंच काम सरकार करतंय. जनतेचं काम सोडविण्यासाठी सिंहासन दिलं. ठाकरे सरकारला मिरवण्यासाठी सिंहासन दिलं नाही”, अशी टीका फडणवीसांनी केली.

जोपर्यंत पाणी प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही- फडणवीस

“आजचा मोर्चा म्हणजे सरकारला एक चॅलेंज आहे. आम्ही सरकारला झोपू देणार नाही, एक-एक दिवस तुमचा भारी करु, जोपर्यंत सामान्य माणसाला तु्म्ही पाणी देत नाही. जोपर्यंत रोज नळाला पाणी येत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. जालन्याचा पाणी प्रश्न रावसाहेब दावनेंच्या नेतृत्वास सोडवून दाखवू”, असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘शतरंज का बादशाह’-दानवे

देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘शतरंज का बादशाह’ आहेत. या सरकारला पाणी प्रश्न सोडवायला जमलं नाही. भाजप सरकारच्या काळात मराठवाड्यात अनेक पाण्याच्या योजना आणल्या. पण या ठाकरे सरकारने सगळ्या योजनांना स्थगिती दिली, अशी टीका दानवेंनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button