‘घटनाबाह्य ‘कलंकीत’ सरकारचा धिक्कार असो!’ विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आज (१७ जुलै, सोमवार) पासून सुरू होत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतील बंडानंतर राजकीय समीकरणं बदलेलं आहे. त्यामुळे सत्ताधारी बिनधास्त आहेत. याउलट काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
राज्य सरकारविरोधात खोक्यावर खोके, एकदम ओके, खोके सरकार हाय हाय.., घटना बाह्य सरकार हाय हाय.., अशा घोषणा विरोधक दिल्या आहेत. घटनाबाह्य ‘कलंकीत’ सरकारचा धिक्कार असो! यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यामध्ये सहभागी झाले होते. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसबोतचे आमदार यामध्ये सहभागी झालेले नव्हते.
हेही वाचा – ‘शरद पवार आणि अजित पवार भेट हा खेळीचा भाग’; प्रकाश आंबेडकर यांचं विधान
महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती काय हे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या ५० टक्के भागामध्ये पाऊसच नाही. शेतकरी हवालदिल आहे. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात मदत पाठवतो असे सांगितले. पण तो शब्द पूर्ण केला नाही. दुर्दैवाने सरकारचे शेतकऱ्याकडे लक्ष्य नाही. सरकारला दिल्लीला जायचे आहे, विस्तार करायचा आहे. पण याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही. त्यावर आजच चर्चा व्हायला हवी, म्हणून स्थगत प्रस्ताव मांडला आहे, असं काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.