breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

#CoronaVirus: “सरकारकडे कोणतीही योजना नाही, लॉकडाउन सुरूच राहणार”

देशभरातील लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. मात्र हा टप्पा पूर्ण होताच ४ मे पासून तात्काळ स्वरुपात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन सुरु राहणार असल्याची नवीन घोषणा केली. या निर्णयानंतर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने मोदी सरकारवर टीका केली आहे.

“लॉकडाउन असाच सुरु राहणार आहे, हे थांबणार नाहीयेत. सरकारकडे कोणतीही योजना नाही, कोणताही आराखडा नाही, आणि तितकी आर्थिक क्षमताही नाही. या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष,अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, कॉर्पोरेटर्स या सगळ्यांनी एकत्र येऊन या समस्येवर मार्ग काढला पाहिजे आणि या सगळ्यावर पंतप्रधानांनी मार्ग काढला पाहिजे”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button