breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मध्य मुंबईचे संकट तीव्र
सुरुवातीच्या काळात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धोकादायक बनलेल्या वरळी, भायखळा या परिसरांतील साथ काही प्रमाणातआटोक्यात येत असताना मुंबईतील सहा विभागांमध्ये करोनाची काजळी गडद होत चालली आहे. दादर, माहीम, धारावी या मध्य मुंबईतील परिसरात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली असून अंधेरी, शीव या भागांतही करोनाचे संकट तीव्र होत चालले आहे.