#CoronaVirus: देशभरात २४ तासात वाढले १४६ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या १३९७
देशभरात २४ तासात १४६ करोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १३९७ वर जाऊन पोहचली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२३८ जणांवर उपचार सुरु आहेत. १२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही संख्या जाहीर केली आहे. महाराष्ट्रातली रुग्ण संख्या ही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एका दिवसात ७२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या एका दिवसात २३० वरुन थेट ३०२ वर जाऊन पोहचली आहे.
Increase of 146 #COVID19 cases in the last 24 hours. Total number of #COVID19 positive cases rise to 1397 in India (including 1238 active cases, 124 cured/discharged/migrated people and 35 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/D9tCpvdNNv
— ANI (@ANI) March 31, 2020
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातली घोषणा मागच्या आठवड्यात केली होती. २१ दिवसांचा लॉकडाउन अर्थात १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.