breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: आईपासून पाच मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत
रांची: संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकलेलं आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, तरीही अनेकांना अद्यापही याचं गांभीर्य कळलेलं नाही. अजूनही अनेकजण कोरोनाच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीये. कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने झारखंडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
झारखंड येथील कोयलानगरी धनबादमध्ये एका चुकीमुळे हसतं-खेळतं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकलं होत. या कुटुंबातील आईसह पाच मुलांचा कोरोनाने जीव घेतला आहे. केवळ 17 दिवसांच्या आत या कुटुंबातील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.