breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

‘जम्मू’मधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्राचा ‘बिग प्लॅन’

नवी दिल्लीः जम्मू विभागात मागच्या दिवसांपासून अनेक दहशतवादी घटना घडत आहेत. शिवाय अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित होत असतानाच रविवारी अमित शाहांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः गृहमंत्री अमित शाह असतील.

सकाळी ११ वाजता दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, एनएसए अजित डोवाल, गृह सचिव, आयबी चीफ, रॉ चीफ, एनआयएचे डीजी, आर्मी, एअरफोर्स यांच्यासह इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या मागणीने आघाडीत ‘बिघाड’?

बैठकीत आयबी आणि रॉ प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील. इतकेच नाही तर या बैठकीत जम्मू भागात गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये 4 दिवसांत दहशतवाद्यांनी 4 हल्ले केले आहेत. रियासी, कठुआ आणि डोडा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी कठुआमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. आजच्या बैठकीमध्ये केंद्र सरकार नेमकं कोणते पावलं उचलणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button