पाकिस्तानी तज्ज्ञांना भारताचे निमंत्रण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/india-pakistan-1-3.jpg)
लाहोर – चेनाब नदीवर भारताकडून जे दोन जलविद्युत प्रकल्प सुरू आहेत त्याची पहाणी करण्यासाठी भारताने पाकिस्तानी तज्ज्ञांना आमंत्रण दिले आहे. त्यानुसार पुढील महिन्यात हे पाकिस्तानी तज्ज्ञ येथून या प्रकल्पाची पहाणी करणार आहेत. भारताकडून चेनाब नदीवर सुरू असलेल्या या दोन जलविद्युत प्रकल्पांना पाकिस्तानचा आक्षेप आहे.
त्यासाठी त्यांना ही पहाणी करण्यासाठी भारताने पाचारण केल आहे. तथापी त्यांचे आक्षेप असले तरी भारताचे या प्रकल्पांचे काम थांबणार नाही असेही भारत सरकारने स्पष्ट केले आहे. नदी पाणीवाटपा बाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये दोन दिवसांची एक परिषद इस्लामाबादेत नुकतीच संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
भारतात पाकल दल डॅमवर 1 हजार मेगावॅट क्षमतेचा आणि 48 मेगावॅट क्षमतेचा असे दोन जलविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. त्याला पाकिस्तानने सातत्याने विरोध केला आहे. या दोन्ही प्रकल्पांची पाकिस्तानी प्रतिनिधींना पहाणी करण्यास भारताने दिलेली अनुमती हे या परिषदेचे महत्वाचे फलित आहे असे सांगण्यात येते.