देशात गेल्या 24 तासात 76,472 जणांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona-virus-2-3-1.jpg)
नवी दिल्ली – भारतासह जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. कोरोनानं जगभरात आतापर्यंत सुमारे 2 कोटी 47 लाख जणांना ग्रासलं आहे. तर सुमारे 8 लाख 36 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. भारतसुद्धा याला अपवाद नसुन देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 34 लाखांच्याही पुढे गेला आहे. गेल्या 20 दिवसांपासून देशात रोजच कोरोनाचा विक्रमी रेकॉर्ड नोंदवला जात आहे. त्यामुळे देशवासीयांच्या चिंतेत आणखीणच भर पडत आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 76 हजार 472 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 34 लाख 63 हजार 973 वर पोहोचला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 26 लाख 48 हजार 998 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. देशात सध्या 7 लाख 52 हजार 424 जणांवर उपचार सुरू आहे. तर कोरोनामुळे सुमारे 62 हजार 550 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोना रिकव्हरी रेट हा 76.47 टक्के असून, पॉझिटिव्ह रेट हा 8.23 टक्के इतका आहे.