breaking-newsराष्ट्रिय
दलितांना संसदेत कमी वेळ दिला जातो- खा. सावित्रीबाई फुले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/savitribai-phule-mp.jpg)
नवी दिल्ली : लोकसभेत अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्ग, आदिवासी समाजावर जेव्हा चर्चा होते. तेव्हा आम्हाला बोलण्यास कमी वेळ दिला जातो. त्यामुळे बहुजन समाजाच्या खासदाराला आपले म्हणणे मांडता येत नसल्याची तक्रार भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी केली आहे.
आरक्षण वाचवण्यासाठी बहुजन समाजातील खासदारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. नमो बुद्धाय जन सेवा समिती आयोजित धरणे आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच स्वपक्षावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून अटक केलेली नाही. हा मुद्दा आपण लोकसभेत उपस्थित करणार आहोत. आरक्षण संपवण्याचा कट कोणत्याही परिस्थितीत साध्य करू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.