“टोमॅटो पाठवू, पण आधी पाकव्याप्त काश्मीर सोडा”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Tomato-new.jpg)
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाकिस्तानात सध्या टोमॅटोचे वाढलेले दर पाहता मदतीसाठी हात पुढे केल्याचे दिसत आहे. मात्र, यासाठी त्यांनी ‘पीओके’ला सोडण्यास सांगितले आहे. झाबुआमधील शेतकऱ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तसा संदेश पाठवला आहे. यात म्हटले आहे की, आपल्या कृत्यांबद्दल माफी मागून त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) सोडले, तर येथील शेतकरी त्यांना टोमॅटो पाठवण्यास तयार आहेत.
पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून टोमॅटोची ४०० ते ५०० रुपये किलो एवढ्या दराने विक्री होत आहे. ही माहिती झाबुआ जिल्ह्यातील पेटलवाद येथील शेतकऱ्यांना माध्यमांद्वारे समजली तेव्हा त्यांनी वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानात टोमॅटो पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र यासाठी पाकिस्ताने पीओके सोडले पाहिजे अशी अट घातली आहे. भारतीय किसान यूनियनच्या झाबुआ येथील शाखेच्यावतीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना २२ नोव्हेंबर यांना पत्र पाठवले आहे. पाकिस्तानने आमच्या देशातील निर्दोषांवर हल्ले केले. दहशतवाद पसरवला, मुंबईत हल्ला केला आणि नंतर पुलवामा येथील घटना देखील घडवली, असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
![](https://pbs.twimg.com/profile_images/1198174260000223232/Hg_LF5CC_normal.jpg)
पाकिस्तान के पीएम @ImranKhanPTI से गुजारिश है कि भारत से लिखित मे अपने कर्मो की माफी मांगे ओर पीओके के साथ दाऊद इब्राहीम ओर हाफिज सईद को सोंपै तब हम झाबुआ के किसान आपको टमाटर देने पर विचार करेगे .. आपके यहां टमाटर कीमत देखकर यह पत्र लिख रहे है @narendramodi
२७५:२८ म.उ. – २३ नोव्हें, २०१९