Breaking-newsराष्ट्रिय
जवानांच्या कुटुंबीयांनीही सोशल मीडिया जबाबदारीने वापरला पाहिजे – लष्करप्रमुख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Bipin-Rawat_PTI-L.jpg)
दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करताना जवान अजिबात संकोच करणार नाहीत असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. 70 व्या लष्कर दिनानिमित्त दिल्लीमधील करिअप्पा मैदानात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देण्यात येईल असंही सांगितलं आहे.
‘आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचं खूप नुकसान झालं आहे. मी आपल्या शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचं पाऊल उचलल्यास कारवाई करण्यास आम्ही संकोच करणार नाही’, असं बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. ‘भारताच्या पश्चिम सीमारेषेवर असणारा देश दहशतवादी संघटनांना मदत करत असून भारतीय लष्कर त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देत आहे’, असंही बिपीन रावत यांनी पाकिस्तानचा उल्लेख न करता यावेळी सांगितलं.