TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सीमाभागातही भाजपची डोकेदुखी वाढली: कर्नाटकमध्ये कमळाला राम राम करत काँग्रेसचा हात हातात घेण्याची शक्यता…

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये भाजपला रोज नवे धक्के बसत असून यामध्ये सीमाभागही मागे नाही. इतर भागातील नेत्यांप्रमाणे सीमाभागातील या पक्षाच्या नाराज नेत्यांनी कमळाला राम राम करत काँग्रेसचा हात हातात घेण्याच्या तयारी केली आहे. भाजपमधील नाराजी नेत्यांच्या बंडखोरीने चव्हाट्यावर येत असल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अकार्यक्षमता, ऐनवेळी बदललेले आरक्षण, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना काही प्रमाणात डावलल्याने लिंगायत समाजात निर्माण झालेली नाराजी, भ्रष्टाचाराची बाहेर पडलेली अनेक प्रकरणे यासह अनेक कारणाने कर्नाटकात भाजपविषयी प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे. यातून कमळाची सत्ता जाणार आणि काँग्रेस सत्तेवर येणार असा अंदाज अनेक सर्व्हेंमधून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या बुडत्या जहाजात न बसता सत्तेकडे जाणाऱ्या काँग्रेसकडे ओढा वाढला आहे. यातूनच भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री एस. अंगारा, डीपी नरीबोल, खासदार कुमारस्वामी यांच्यासह रामाप्पा लमाणी, गुलिहाटी शेखर, शंकर आर, मंजुनाथ कुन्नुर, नागनगौडा केदनुर, एन. लिंगाण्णा, शिवकुमार शेट्टी, येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय डॉ. विश्वनाथ अशा अनेकांनी भाजपला रामराम केला आहे. रोज अशा नेत्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये हळूहळू सीमाभागातील आमदार व नेतेही सहभागी होत आहेत. उमेदवारी न मिळालेले आमदार अनिल बेनके राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहेत. संजय पाटील, धनंजय जाधव, डॉ. सरनोबत हे सारे नाराज आहेत. तेही बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

सीमाभागात सहा जागा लढवत भाजप आणि काँग्रेसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू केले आहे. त्यापैकी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये खानापुरातून मुरलीधर पाटील, उत्तरमधून अमर यळूरकर तर ग्रामीण मधून आर.एम. चौगले यांचा समावेश आहे. भाजपमधील नाराजीचा फायदा उठविण्यासाठी एकीकरण समिती प्रयत्न करत आहेत. सध्याच्या सभागृहात समितीचा एकही आमदार नाही, त्यामुळे सीमाबांधवांचा आवाज पोहोचत नसल्याने एकी दाखवत सहा जागा निवडून आणण्यासाठी समितीने फिल्डिंग लावली आहे.

सवदींमुळे भाजपला दणका
सीमाभागातील अथणी मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री सवदी यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बेळगावसह सीमाभागात त्यांची ताकद आहे. यामुळे याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button