breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
Big News : राज्यातील नवीन विकासकामे, योजना थांबवा; वित्त विभागाचे आदेश
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या पार्शवभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे राज्याची आर्थिक परिस्थिती आणखी गंभीर झाली असून नवीन विकासकामे किंवा योजना तातडीने थांबविण्याचे आदेश वित्त विभागाने शासनाच्या सर्व विभागांना दिले आहेत. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला.
संपूर्ण देशात कोरोनाच्या संकटामुळे मार्च 2020 पाडून देशासह राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात राज्यसरकारला तब्बल सुमारे 60 हजार कोटी रुपये आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज आहे. सर्व व्यवहार बंद असल्याने जीएसटी, विक्रीकर, उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क तसेच अन्य करातून मिळणारे उत्पन्न थांबले आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2020 चे वेतन दोन टप्प्यात द्यावे लागले होते.