breaking-newsमहाराष्ट्र

#BharatBandh: स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाण्यात रेल्वे रोखली

बुलडाणा – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांनी नव्याने लागू करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात अनेक बैठका झाल्या, मात्र त्या निष्फळ ठरल्या. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

वाचा :-आज भारत बंद! दूध, फळ, भाजीपाला मिळणार नाही; केवळ ‘या’ सेवा सुरू राहणार

शेतकऱ्यांच्या या भारत बंदला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलडाण्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन केले असून नवजीवन एक्स्प्रेस रोखून धरली आहे. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली असून त्यांच्यात आणि रेल्वे पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे समजते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button