#BharatBandh: ठाण्यात पूर्व द्रूतगती मार्गावर चक्काजाम
ठाणे – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांनी नव्याने लागू करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात अनेक बैठका झाल्या, मात्र त्या निष्फळ ठरल्या. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
वाचा :- #BharatBandh: स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाण्यात रेल्वे रोखली
शेतकऱ्यांच्या या भारत बंदला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पूर्व द्रूतगती मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. भारतीय जय हिंद पार्टीकडून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आले असून यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला.
वाचा :-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार रवाना