breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

धक्कादायक! शेतकऱ्याला मारहाण करत विष्ठा खायला लावली, अमरावतीतील संतापजनक प्रकार

अमरावती: जिल्ह्यातील वरुड तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. येथे आपआपसातील वादातून एका शेतकऱ्याला विष्ठा खायला भाग पाडल्याची घटना घडली आहे. तसेच, या शेतकऱ्याला जबर मारहाणही करण्यात आली आहे. याप्रकरणी बेनोडा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन आत्मारामजी बुरंगे ( वय ६०), भूषण बबन बुरंगे (वय ३२) सुरेश आत्मारामजी बुरंगे (वय ५०) आणि राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम ठाकरे (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावं आहेत.

या प्रकरणातील ४५ वर्षीय शेतकरी आणि बुरंगे यांच्यात शेताच्या रस्त्याचा वाद सुरू आहे. गुरुवार (३ जून) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तक्रारदार शेतकरी शेतातून गावात येत होता. त्याचवेळी बबन बुरंगे आणि अन्य तिघे त्याच मार्गाने जात होते. त्यावेळी बबन बुरंगेने तक्रारदार शेतकऱ्याला सुरुवातीला त्याच्याशी वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठीनेही मारहाण करण्यात आली. तर, भूषण बुरंगे याने राजा ठाकरेला विष्ठा आणयला सांगितली. त्यानंतर ती विष्ठा तक्रारदाराला खाण्यास भाग पाडले, असा खळबळजनक आरोप तक्रारदार शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणी तक्रारदार शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध मारहाण, तसेच विष्ठा खाण्यास भाग पाडल्याचा आरोप असल्यामुळे, ज्या कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आजाराचे संक्रमण होईल, असे कृत्य करणे या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button