breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अमित शाह यांची भाजप नेत्यांना तंबी; चंद्रकांत पाटल्यांच्या विधानाची दखल

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने खपवून घेणार नाही

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी आंदोलनातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं योगदान नाकारलं आहे. बाबरी आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता नव्हता. बाबरी पाडण्याचं सर्व श्रेय हे विश्व हिंदू परिषदेलाच जातं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागितला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते अमित शाह यांनी या विधानाची दखल घेत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तंबी दिली आहे.

भाजपचे आमदार अशिष शेलार काल दिल्लीत होते. शेलार यांनी काल अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. राज्यातील राजकीय समीकरणं, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती यावरही या नेत्यांसोबत शेलार यांनी चर्चा केली. त्यावेळी अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील नेत्यांनी वादग्रस्त विधाने करू नये.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. ते योग्य नाही. याला आवर घाला. केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहे. दोन्ही सरकारच्या विकासकामांवरच बोला, अशी ताकीदच अमित शाह यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिली असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button