breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

१०० कोटींचे आरोप हवेत विरले, परमबीर रेटून खोटं बोलले, चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट?

मुंबई |

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं अहवाल नमूद करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे चांदिवाल आयोगाचा अहवाल अनिल देशमुख यांच्यासाठी सर्वांत मोठा दिलासा मानण्यात येतोय. अहवालानंतर देशमुखांना क्लिनलिट मिळणार का? याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय.

मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरंटमधून तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दरमहिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप पत्रातून करण्यात आला होता. याच लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली. दरम्यान, या प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपांमुळे देशमुखांना गृहमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. दुसरीकडे, चांदिवाल आयोगाचा अहवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं अहवाल नमूद करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button