breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

फाटलेला खिसा, रक्ताळलेले कपडे; एकांतात नेऊन मारहाण केल्याचा युवा वारकऱ्याचा आरोप

Alandi : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी मंदिराच्या बाहेर काही वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जच केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या एका वारकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आळंदीत वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्जच नाही तर काही जणांना एकांतात नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप वारकऱ्याने केला आहे. या व्हिडीओची आम्ही पुष्टी करत नाही.

विशाल रावसाहेब पाटील असं या तरूणा वारकऱ्याचं नाव आहे. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावेळी मंदिराच्या बाहेर अचानक पोलिसांच्या दिशेने बॅरिगेट्स तोडून तरूण वारकऱ्यांचा घोळका धावत आला. त्यामुळो पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी लाठीचा वापर केला. वारकरी आणि पोलिस समोरासमोर आले होते. त्यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी वारकऱ्यांना धरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. काही तरूण वारकऱ्यांना एकांतात नेऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप विशाल पाटील याने केला आहे.

हेही वाचा – ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

व्हिडीओ पाहा – https://twitter.com/Sarangsspeaks/status/1667984555511541760

मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. आमचं म्हणणं होतं की आम्हाला प्रस्थान सोहळ्याला सोडा, ते दरवर्षी सोडतात. पण, अचानक ठरलं की आम्हाला आत सोडायला नाही. आम्हा चार विद्यार्थांना वीस पोलिसांनी मारहाण केली. एकांतात घरात नेऊन मारलं आहे. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवर हात उचलू शकतात. पोलिसांना मारहाण का? केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं, असंही विशाल पाटील म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button