ऑस्ट्रोलिया मालिकेआधी भारतीय संघात मोठा बदल; BCCI ने दिली माहिती
वॉशिग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर आणि राहुल चहर या खेळाडूंचा संघात समावेश
मुंबई : भारतविरूद्ध ऑस्ट्रोलिया कसोटी मालिकेला अवघे काही दिवस उरले आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने वॉशिग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर आणि राहुल चहर यांना भारतीय संघात संधी मिळणार आहे. भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी मालिका होणार आहेत. या मालिकेत फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे.
भारतीय संघात फिरकीपटू म्हणून रविचंद्रन आश्विन, रविद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. यासोबतच जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव या देखील गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे भारताकडे सरावासाठी ८ गोलंदाज असणार आहेत.
भारतीय संभाव्य संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकिपर), आर. आश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
पहिला कसोटी सामना – ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
दुसरा कसोटी सामना – १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरा कसोटी सामना – १ ते ५ मार्च, धर्मशाला
चौथा कसोटी सामना – ९ ते १३ मार्च, अहमदाबाद