breaking-newsपुणे
कोंढवा दुर्घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणार
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. प्रथमदर्शनी या सगळ्या प्रकारात बिल्डर आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवल्याचं दिसतं आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन नवल किशोर राम यांनी म्हटलं आहे. मृत मजूर हे बिहार आणि बंगालमधून आल्याचं सांगितलं जातं आहे. पुण्यात गुरूवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे इमारतीजवळची भुसभुशित झाली आणि त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.