Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

‘आम्ही कोलकातापर्यंत पोहोचू’, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला धमकी

India Pakistan Tension | भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा देताना थेट कोलकाता शहराचा उल्लेख करत आक्रमक विधान केले आहे. “भविष्यातील कोणताही संघर्ष केवळ सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो थेट भारताच्या आतपर्यंत पोहोचेल,” असे त्यांनी शनिवारी म्हटले. मात्र, त्यांच्या या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही.

सियालकोट येथे पत्रकारांशी बोलताना आसिफ यांनी भारतावर ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ (बनावट कारवाई) करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जर भारताने यावेळी कोणतीही बनावट कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर देवाची इच्छा असल्यास, आम्ही ते कोलकातापर्यंत नेऊ.” तसेच स्वतःच्या नागरिकांचा किंवा ताब्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा वापर करून मृतदेह ठेवले जाऊ शकतात आणि त्याचा दोष दहशतवादावर टाकला जाऊ शकतो, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा     :                बारामती पोटनिवडणुकीत लक्ष्मण हाके यांची एंट्री; सोमवारी अर्ज दाखल करणार 

केवळ कोलकाताच नव्हे, तर संघर्षाची पुढील फेरी अधिक भीषण असेल, अशी धमकीही त्यांनी दिली. “आम्ही त्यांच्या हद्दीत प्रवेश करून त्यांच्याच घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करू,” असे आक्रमक विधान त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, पाकिस्तानच्या या विधानांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही कडक शब्दांत इशारा दिला होता. केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचे ‘दुष्ट कृत्य’ केल्यास भारताकडून अभूतपूर्व आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “आमची मोहीम अजून संपलेली नाही. पाकिस्तानने पुन्हा तसा प्रयत्न केल्यास आमचे सशस्त्र दल त्यांना कधीही न विसरणारे सडेतोड उत्तर देतील.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button