पुन्हा अवकाळी पाऊस
पुणे : दिवाळीनंतर गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना राज्यातील अनेक भागात सोमवारी पावसाने अचानक हजेरी लावली. रत्नागिरी, परभणी, लातूर, सांगली, पंढरपूर आणि कोल्हापूर येथे मुसळधार पाऊस पडला. तर, राज्यभरात सर्वत्र ऊन आणि नंतर ढगाळ वातावरण होते. कोकण, गोवा, उत्तर-मध्य आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मंगळवारी (२० नोव्हेंबर) पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी या पावसाने पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागते. मात्र, यंदा दिवाळीपूर्वी तीन दिवस पाऊस झाला. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात थंडी सुरू झाली होती. मात्र मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये रविवारपासून उकाडा जाणवत होता. सोमवारी मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला. त्याचबरोबर मुंबई, पुण्यासह अनेक भागांमध्ये दिवसभर विचित्र ढगाळ वातावरण होते.
मराठवाडय़ात मुसळधार
परभणी आणि लातूर जिल्ह्य़ात रविवारी आणि सोमवारी पावसाने हजेरी लावली. पालम तालुक्यातील बनवस गावात वीज कोसळली. बालाघाट डोंगर परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हा पाऊस