‘भारतीय लोक आळशी आहेत असे नेहरूंचे विचार होते’; पंतप्रधान मोदींची टीका
नवी दिल्ली | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घरणेशाहीविरोधात हल्लाबोल केला. काँग्रेसममुळेच देशाचं नुकसान झालं असून, घराणेशाहीला आमचा विरोध आहे. भारतीय लोक आळशी आहेत असे नेहरूंचे विचार होते, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही ग्रामीण भागातील गरीबांसाठी चार कोटी घरं बांधली, शहरी गरीबांसाठी ८० लाख पक्की घरे बांधली. जर काँग्रेसच्या गतीने गेलो असतो तर या विकासाला १०० वर्ष लागले असते. या कामासाठी पाच पिढ्या लागल्या असत्या. १० वर्षात ४० हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन झाले. जर काँग्रेसच्या वेगाने गेलो असतो तर या कामाला ८० वर्ष आणि चार पिढया लागल्या असत्या. आम्ही दहा वर्षात १७ कोटी गॅस कनेक्शन दिले, काँग्रेसच्या गतीने या कामासाठी ६० वर्ष लागले असते. तीन पिढ्या धुरात गुदमरल्या असत्या.
काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे खूप नुकसान झाले. काँग्रेसने देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही. त्यांनी स्वतःला शासक मानले आणि जनतेपासून अंतर ठेवून त्यांना लहान समजले. काँग्रेसच्या देशातील नागरिकांबद्दल कसा विचार करतात याबद्दल मी बोललो तर काँग्रेसला राग येतो. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी जे सांगितले होते, ते पुन्हा वाचून दाखवतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा – आनंदाची बातमी! २० हजारहून अधिक जागांच्या जाहिराती निघणार
#WATCH | PM Narendra Modi says, "Congress' mindset is that it has never trusted the capability of the country. It considered itself rulers and the public as someone lesser, someone smaller…"
He reads out a statement of the then PM Jawaharlal Nehru, "…It means that Nehru ji… pic.twitter.com/69D6kTgmLO
— ANI (@ANI) February 5, 2024
भारतात अधिक मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात. हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे, म्हणजे नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते. भारतीय कमी अक्कल असलेले आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
इंदिरा गांधी यांचीही विचारसरणी वेगळी नव्हती. त्यांनी लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी म्हटले होते की, दुर्दैवाने आमचे काम जेव्हा पुर्णत्वास जात असते, तेव्हा आम्ही आत्मसंतुष्ट होतो आणि जेव्हा आमच्यासमोर संकट येते, तेव्हा नाउमेद होऊन जातो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे. आजच्या काँग्रेसकडे लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील लोकांचे आकलन चुकीचे केले असेल. पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.