‘अजितदादांनी मलिकांना जर घेतलं नाही, तर खरा पिक्चर सुरू’; बच्चू कडूंचं विधान चर्चेत
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच नवाब मलिक हा विषय चांगलाच गाजतो आहे. नवाब मलिकांना महायुती सरकारमध्ये घेण्यास नकार दिला आहे. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले, अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. नवाब मलिक उद्या म्हणाले की मला अजित पवारांसह जायचं आहे आणि अजित पवार जर म्हणाले की नाही घेत त्यांना तर खरा पिक्चर सुरु होईल. त्या त्या पक्षाची धोरणं सांभाळायचा आहे. नवाब मलिकचा विषय फडणवीस यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. मी त्यांच्या मनातलं कसं काय सांगणार? असं बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा – सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ‘या’ विद्यार्थ्यांना विद्यापीठात मोफत शिक्षण मिळणार
महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे. आम्ही १५० होतो आता २०० झालो आहोत असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे चुलीत घाला. मला काही घेणंदेणं नाही असंही बच्चू कडू म्हणाले.