मविआमध्ये जागावाटपाचं सूत्र ठरलं? संजय राऊत यांचं मोठं विधान
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासांठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मविआतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधले विद्यमान आमदार, खासदार मोठ्या प्रमाणावर सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे मविआतील जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र मविआ मजबूत आहे. मविआ विधानसभा, लोकसभा एकत्र लढणार आहे. अनेकांना जागावाटपात तडजोड कराव्या लागतील. ते करायला आमची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की जागावाटपावरील मतभेद उघड करायचे नाहीत. जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र आहे.
हेही वाचा – मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक स्थगित! ठाकरे विरूद्ध ठाकरे सामना लांबला
मुंबई विद्यापीठ प्रशासनानं सिनेट निवडणूक रद्द झाल्या आहेत. यावरू संजय राऊत म्हणाले, सिनेटची निवडणूक रद्द केली यात आश्चर्य वाटावं असं काहीही नाही. राज्यातलं सरकार भीतीपोटी कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेचं पॅनल १०० टक्के जिंकणार होतं. या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या. आपण किती निवडणुका रद्द करणार आहात? तुम्ही महापालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपोटी घेत नाहीत. उद्या या भीतीपोटी तुम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळी घेणार नाहीत का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.