breaking-newsराष्ट्रिय
मिर्चपूर दलित हत्याकांड-उच्च न्यायालयात 33 दोषी. 12 ना जन्मठेप
नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने सन 2010च्या मिर्चपूर दलित हत्याकांड प्रकरणात 33 आरोपींना दोषी ठरवले असून 12 जणांना जन्मठेप सुनावली आहे. कनिष्ठ न्यायालयाने 20 जणांना निर्दोष सोडण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने फिरवला असून, 13 जणांना दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
या 13 पैकी काही जणांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयाने वाढवली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली, तरीही दलितांवर अत्याचार होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही, असे न्यायमूर्ती एस. मुरलीधर न्यायमूर्ती आय एस मेहता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील मिर्चपूर गावात एक दलित वृद्ध आणि त्याच्या अपंग मुलीला एप्रिल 2010 मध्ये जाट समाजाच्या काही लोकांनी जिवंत जाळले होते.