मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाच दिवस धोक्याचे
मुंबई – मान्सूनला सुरुवात झाल्यापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यातच आता आणखी पुढील पाट दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
उद्या रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आह. तर मुंबई, ठाणे, जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
13 जून
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्गमध्येही निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
14 जून
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
15 जून
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , ठाणे आणि मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर, उस्मानाबाद मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.