राज्यात २७ जानेवारीपासून सुरू होणार प्रत्यक्ष शाळा
मुंबई – कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १० महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद होत्या. मात्र,आता राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील,अशी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (१५ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली आहे.
वाचा :-नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावं: राजेश टोपे
शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, एकीकडे कोरोना स्थितीमुळे अजूनही पालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला विद्यार्थी आणि पालकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.