औरंगजेब-बुखारी हत्येनंतर काश्मिरात “आजादी’ ऐवजी “भारत माता की जय’
जम्मू (जम्मू-काश्मीर) – बुखारी हत्येनंतर काश्मिरात लोक “आजादी’ ऐवजी “भारत माता की जय’ च्या घोषणा देताना दिसत् आहेत. भारतीय लष्करातील जवान औरंगजेब अणि ज्येष्ठ पत्रकार आणि रायजिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील वातवरणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. किश्तवाड येथील एक व्हिडियो व्हायरल होत आहे, ज्यात लोक आजादीऐवजी भारत माताकी जय अशा घोषणा देताना दिसत आहेत. या व्हिडियोमध्ये स्थानिक युवकांबरोबर भारतीय सुरक्षा दलाचे जवानही दिसत आहेत. मात्र हा व्हिडियो नेमका किती तारखेचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दोन मोठ्य हत्या झाल्या आहेत. पहिले घटना पुलवामा येथील आहे. औरंगजेब नावाच्या एका जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली. दुसरे घटन श्रीनगरमधले आहे. शुजात बुखारी या ज्येष्ठ पत्रकारा आणि रायजिंग काश्मीर या दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांची त्यांच्या कार्यालयाजवळच त्यांच्या मोटर कारमध्ये हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्यांबाबत संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नाराजीचे वातावरण बनले आहे.